दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२५ : सिनेसृष्टीचा १० वर्षांचा प्रवास होणार मुंबईत साजरा!

मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) २०२५ हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या दहाव्या वर्षाचा गौरव साजरा करणारा एक खास सोहळा असणार आहे. भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे धुंडिराज गोविंद फाळके यांना श्रद्धांजली अर्पण करत हा महोत्सव दरवर्षी पार पडतो. DPIFF हा देशातील एक मानाचा आणि लोकप्रिय चित्रपट पुरस्कार समारंभ ठरला आहे, ज्यामध्ये मोठे कलाकार आणि नवीन चेहऱ्यांना एकाच मंचावर सन्मानित केले जाते.


याआधी २०२४ मध्ये झालेला DPIFF पुरस्कार सोहळा खूपच चर्चेत होता. शाहरुख खान, करीना कपूर खान, नयनतारा, राणी मुखर्जी, शाहिद कपूर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा सोहळा केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो सिनेसृष्टीतील कला, मेहनत, आणि प्रतिभेचा एक भव्य उत्सव असतो. दरवर्षी यामध्ये कलाकारांसोबतच सरकारी अधिकारी, चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर सहभागी होतात.


दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यानंदाचे १०वे वर्ष आहे , या वेळी हा सोहळा आणखी भव्य आणि आकर्षक असणार आहे. भारतातील विविध भागांतील कथा, चित्रपट, गाणी आणि कलाकारांचा गौरव या मंचावर केला जाणार आहे. या सोहळ्यात ग्लोबल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल देखील आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये जगभरातील तरुण आणि नवोदित चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी काही आंतरराष्ट्रीय कलाकार आणि व्यक्तीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. DPIFF चे सीईओ अभिषेक मिश्रा म्हणाले, “आपण दहाव्या वर्षात प्रवेश करत आहोत आणि यंदाचा महोत्सव हा केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक चित्रपटसृष्टीतील एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे.” हा महोत्सव २९ आणि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत पार पडणार आहे . हा सोहळा सिनेसृष्टीतील कला, कथा आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा एक सुंदर संगम असणार आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी