वाकोला पुलावरील खड्ड्यांवर कायमचा उपाय

पुलावरील विद्यमान डांबराचा थर उकरून नव्याने बसवणार


मुंबई (प्रतिनिधी) : वाकोला पुलावर खड्डे पडल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. मात्र, या पुलाचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले असले तरी पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई महापालिकेला हस्तांतरित झाल्याने त्यावरील पुलांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या खांद्यावर पडली. त्यामुळे या पुलावरील खड्डे बुजवून महापालिकेने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरीही हा कायमस्वरूपी उपाय नसून यावरील डांबराचा थर उकरून काढून नव्याने रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण केल्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे पावसानंतर या पुलावरील डांबराचा थर उकरून काढून त्यावर नव्याने डांबराचा थर चढवला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिका पूल विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे.


मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपूल नेहमीच चर्चेत असतो, विशेषतः पावसाळ्यात. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडले असून, छोटे-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा पूल बांधला असला, तरी सध्या या पुलाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची यावर स्पष्टता नसली तरी अप्रत्यक्ष याची देखभाल मुंबई महापालिकेच्या खांद्यावर आहे.


वाकोला पुलावर मुसळधार पावसामुळे या ठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खड्ड्यांमुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही, तर वाहनांचे नुकसानही होत आहे. तसेच, दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती केली असली, तरी काही दिवसांनी खड्डे पुन्हा दिसून येत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.


या पुलावरील खड्ड्यांची वारंवार दुरुस्ती करूनही खड्डे पुन्हा का पडतात, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे खड्डे पुन्हा लवकरच निर्माण होतात, अशी टीका होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. मुख्यमंत्री आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई महापालिकेला हस्तांतरित झाल्याने या वाकोला पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर टाकली गेली आहे. त्यामुळे या पुलाचे निकृष्ठ काम झाल्याने यावरील डांबराचा थर काढून नव्याने थर टाकण्याचा विचार महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी या पुलावरील जेवढे खड्डे होते ते बुजवण्याचे कार्यवाही केली.

Comments
Add Comment

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने

Booby Deol : "नर्व्हस झालो, अक्षरशः घाम फुटलेला!"- 'आश्रम 3' मधील बोल्ड सीनबद्दल बॉबी देओलचा खुलासा; चाहत्यांना धक्का!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात

आता दूरदर्शन नंतर आता स्टार प्लस आणि जिओ हॉटस्टारवर AI महाभारत ...बिग बीनी सुद्धा दिल्या शुभेच्छा

मुंबई : येत्या २५ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर आणि २६ ऑक्टोबरला स्टार प्लसवर AI महाभारत प्रसारित होणार आहे. AI

प्रसिद्ध गायक ऋषभ टंडनचं ३५ व्या वर्षी निधन, पत्नी ओलेसियाची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

दिल्ली : गायक ऋषभ टंडन दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या दिल्लीच्या घरी गेला होता. तिथेच त्याचा हृदयविकाराच्या

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, भारताला फलंदाजीस बोलावले

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस