गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी असलेल्या शालीमार या ५ मजली इमारतीला अचानक आग लागल्यामुळे, नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.


गोरेगाव पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील सिद्धी गणेश सोसायमधील शालिमार या पाच मजली इमारतीला आज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत असून विविध अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.





आग लागण्याचे कारण?


आगीचे कारण समोर आले असून, इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने दुपारी १२.२५ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र. १) असल्याचे घोषित केले.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक