गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी असलेल्या शालीमार या ५ मजली इमारतीला अचानक आग लागल्यामुळे, नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.


गोरेगाव पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील सिद्धी गणेश सोसायमधील शालिमार या पाच मजली इमारतीला आज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत असून विविध अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.





आग लागण्याचे कारण?


आगीचे कारण समोर आले असून, इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने दुपारी १२.२५ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र. १) असल्याचे घोषित केले.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक