IND vs UAE: सूर्या ब्रिगेडची विजयी सलामी, भारताने यूएईला ९ विकेटनी हरवले

दुबई: आशिया कप २०२५मध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यूएईवर दणदणीत विजय मिळवला आहे. यूएईवर भारताने ९ विकेट राखत विजय मिळवला आहे. या सामन्यात यूएईने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अवघ्या ५७ धावाच केल्या. ५७ धावांतच त्यांचे १० गडी बाद झाले. कुलदीप यादवने चार बळी घेतले तर शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या.


आजचा हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यूएईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३.१ षटकांत केवळ ५७ धावा केल्या. यूएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर त्याच्यापाठोपाठ सलामीवीर मोहम्मद वसीमने १९ धावा केल्या.


त्यानंतर भारताचे सलामीवीर ही धावसंख्या पूर्ण करण्यास पुरेसे ठरले. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावा ठोकल्या तर सलामीवीर शुभमन गिलने नाबाद २० धावांची खेळी केली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या सूर्याने नाबाद ७ धावा केल्या.

भारताचा पुढील सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. १४ सप्टेंबरला हा सामना रंंगत आहे.

Comments
Add Comment

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद! २० वर्षीय नेमबाज राणा झाला 'सम्राट'

इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात खेळण्यास सज्ज! ऐतिहासिक ईडन गार्डनवर होणार पहिला कसोटी सामना

कोलकता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी