महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज


पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर गुरुवार, ११ सप्टेंबर आणि शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी पार पडणार आहे. हरकती दाखल करणाऱ्यांनी या सुनावणीला उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. कोर्टाच्या आदेशानंतर या निवडणूक प्रक्रियेला गती आली. गेल्या महिन्यात निवडणूक विभागाच्या आदेशानुसार प्रभागरचना जाहीर करण्यात आली. मात्र, ही प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.


नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे प्रभाग रचनेत मोठे बदल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. या रचनेविरोधात नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ५ हजार ९२२ हरकती नोंदल्या गेल्या, त्यापैकी दोन दिवशी सर्वाधिक हरकती दाखल झाल्या, तर शेवटच्या दिवशी तब्बल साडेतीन हजार हरकती दाखल झाल्या.


या हरकतींवर सुनावणी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी व्ही. राधा यांची नगरविकास विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या प्रत्येक हरकत व सूचनेवर सुनावणी घेऊन याबाबतचा अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. प्रभाग रचनेविरोधातील ही सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.


११ सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक १ ते २९, तर १२ सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३० ते ४१ या प्रभागांवरील हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीसाठी हरकती दाखल केलेल्या नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. महापालिकेने प्रभागनिहाय वेळापत्रक जाहीर केले असून, याबाबतचे पत्र प्रत्येक अर्जदाराला पाठविण्यात आले आहे.


४१ प्रभागांतून निवडून जाणार १६५ उमेदवार


पुणे महापालिकेत एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चारसदस्यीय आहेत, तर आंबेगाव-कात्रज (प्रभाग क्रमांक ३८) हा पाचसदस्यीय ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला पालिकेत ३४ गावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांना वगळले. या बदलांमुळे नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही पक्षांकडून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांना पोषक रचना झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


प्रभागनिहाय सुनावणी अशी होणार
१) ११ सप्टेंबर २०२५ (गुरुवार)




  • प्रभाग १ ते ६ - सकाळी १० ते सकाळी ११.३० वा.

  • प्रभाग ७ ते १४ - सकाळी ११ ते दुपारी १.३० वा.

  • प्रभाग १५ ते २१ - दुपारी २.३० ते सायं. ४ वा.

  • प्रभाग २२ ते २९ - सायं. ४ ते सायं. ६ वा.


२) १२ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार)




  • प्रभाग ३० ते ३४ - सकाळी १० ते सकाळी ११.३० वा.

  • प्रभाग ३५ ते ३७ - सकाळी ११ ते दुपारी १ वा.

  • प्रभाग ३८ ते ४१ - दुपारी २.३० ते सायं. ४ वा.

  • सामाईक हरकती राखीव - सायं. ४ ते सायं ५ वा.



प्रभाग रचनेबाबत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर येथे ११ आणि १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. सुनावणीसाठी संबंधितांना वेळापत्रक व पत्र पाठविण्यात आले आहे.
- प्रसाद काटकर, उपायुक्त (निवडणूक विभाग)


Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील