जीएसटी कपात झाली आता सरकारकडून व्यापारांसाठी महत्वाचा निर्णय

प्रतिनिधी: आता जीएसटी कपातीनंतर जुन्या वस्तूंचा साठा (Goods Stocks) नव्या एमआरपी (Maximum Retail Price MRP) सह विकता येणार आहे. सरकार यावर गांभीर्याने विचार करत असून किंमतीच्या पुनर्रचनेला सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे खपला गेला नसलेला माल विक्रेते जीएसटी दरकपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे आपला थकलेला माल क्लिअरन्स (Stock Clearance) करण्यासाठी व्यापारांना मदत होईल. हा निर्णय उत्पादक व आयातदारांना लागू असेल. सरकारने कंपन्यांच्या आग्रहाखातर या निर्णयाला मान्यता दिली.

त्यामुळे सरकारने नवीन जीएसटी नियमांनुसार पॅकेज केलेल्या वस्तूंचे उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना विक्री न झालेल्या स्टॉकवर सुधारित एमआरपी छापण्याची परवानगी दिली आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत विद्यमान पॅकेजिंग साहित्य आणि रॅपर्स संपवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जीएसटी कपातीमुळे पुनर्मुद्रित (Reprinting) करून कंपन्यांना माल नव्या छापील किंमतीसह विकता येईल. कंपन्यांनी नव्या किंमतीचा आग्रह करण्याचे मुख्य कारण म्हणजे जुन्या किंमतीसह पॅकेजिंग वाया जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उद्योजककांनी किंमत पुनर्मुद्रित करण्याची परवानगी मागितली होती.

उद्योग संस्थांकडून अर्थ मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार विभागाला पाठवलेल्या पत्रांमध्ये, कंपन्यांनी असे निदर्शनास आणून दिले की त्यांच्याकडे पुरवठा साखळीत (Supply Chain) साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा साठा असतो, ज्यामध्ये लाखो वस्तूंचा समावेश असतो. त्यामुळे अखेरीस सरकारने नव्या नियमांसह व्यापारी वर्गाला दिलासा दिला आहे.
Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Vikroli Crime : 'गाणी हळू वाजव' एवढंच बोलला अन्... ; दोन सख्या भावांमध्ये रक्तरंजित खेळ; दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद