समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा


दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत दापोली – मंडणगड व खेड तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेस ग्रामविकास व पंचायतीराज राज्य मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.


जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक तसेच सरपंच यांना संबोधित करताना मंत्री महोदयांनी सांगितले की, “लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून तालुकास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर तब्बल ३०० कोटी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. आपल्या मतदारसंघाने राज्यात सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत यासाठी अधिकारी व सरपंचांनी विशेष प्रयत्न करावेत” असे आवाहन केले. यावेळी मंत्री महोदयांनी विश्वास व्यक्त केला की, “१७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून बक्षिसे जिंकेल.”


कार्यशाळेस जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानडे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली/खेड गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात, माजी पंचायत समिती सभापती दापोली किशोर देसाई, शिवसेना दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी, तसेच दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ मुंबई (खास प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वजनिक

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

भटक्या श्वानांचे लसीकरण २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज

मुंबईतील ५७४ रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार

अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने