तो एक गुंड आहे ! – सलमान खानबद्दल अभिनव कश्यपचे धक्कादायक दावे

अनुराग आणि अभिनव कश्यप दोघांचेही सलमानवर आरोप


मुंबई : २०१० मध्ये आलेल्या सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानसोबतच्या अनुभवाबद्दल एका मुलाखतीत स्पष्ट आणि परखड वक्तव्य केले आहे.


माध्यमांशी संवाद साधताना, कश्यप यांनी सलमानवर कामाविषयी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की सलमान खानच्या अभिनयात कधीच उत्साह नव्हता आणि तो आपल्या अभिनयाबाबत फारसा गंभीरही नव्हता. कश्यप म्हणाले, "सलमान कधीही कामात पूर्णपणे सहभागी होत नाही. त्याला अभिनयात आजिबात रस नाही, तो शूटिंगला येतो, हे तो स्वतःवर उपकार करतो . त्याचं लक्ष सेलिब्रिटी इमेजवर जास्त असतं, अभिनयावर नाही."


अभिनव यांनी सलमानला "असभ्य" आणि "गुंड" असंही संबोधलं. त्यांनी आरोप केला की खान कुटुंब बॉलीवूडमध्ये वर्चस्व ठेवतं आणि त्यांच्या विरुद्ध कोणी गेलं, तर ते सूड घेतात. "सलमान एक फिल्मी घराण्यातून येतो आणि ते लोक सगळ्यावर नियंत्रण ठेवतात. जर कोणी त्यांच्या विरोधात गेला, तर ते त्याच्याविरुद्ध कारवाई करतात," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.


अनुराग कश्यपलाही आले होते असेच अनुभव


अभिनव यांनी सांगितले की त्याचा भाऊ, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यालाही याच प्रकारचा अनुभव ‘तेरे नाम’च्या वेळी आला होता. "दबंगपूर्वीच अनुरागने मला सांगितलं होतं की तू सलमानसोबत चित्रपट करू शकणार नाहीस. पण त्यावेळी त्याने मला सविस्तर काही सांगितलं नाही. त्याला माहिती होतं की मला त्रास दिला जाईल, कारण तो या गिधाडांना ओळखतो," असं अभिनव म्हणाले.


त्यांनी हेही उघड केलं की ‘तेरे नाम’ची पटकथा अनुरागने लिहिली होती, पण नंतर त्याला प्रोजेक्टमधून बाजूला केलं गेलं आणि त्याला योग्य श्रेयही दिलं नाही. "बोनी कपूरने त्याच्याशी गैरवर्तन केलं आणि नंतर त्याला चित्रपटातून काढून टाकलं," असं त्यांनी नमूद केलं.


अनुराग कश्यपचा खुलासा २०२३ मध्ये


२०२३ मध्ये अनुराग कश्यपने 'अनफिल्टर्ड बाय समदीश' या शोमध्ये हे स्पष्ट केलं होतं की त्याला एका मोठ्या अभिनेत्याला दिलेल्या सल्ल्यामुळे प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. त्याने सांगितलं, "मी नायकाला त्याच्या छातीवर वॅक्स लावू नका, असं सांगितलं, आणि त्यामुळं मला त्या चित्रपटातून हटवण्यात आलं." असं ते म्हणाले .

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष