शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'

मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे असे मत प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.





'धुरंधर २' च्या निमित्ताने नवीन चित्रपटयुगाचा जन्म आहे. आणि चित्रपटसृष्टीच्या पूर्वीच्या जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा हा निर्दयी अंत आहे. आता 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा आदित्य धर असे असेल. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग व क्रिस्टोफर नोलन यांनी आपली सर्व कामे सोडून 'धुरंधर २' चा प्रदर्शनाच्या दिवशीचा पहिला शो पाहणे हेच शहाणपणाचे आणि योग्य ठरेल; या शब्दात प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक्स पोस्ट (ट्विटर) करून 'धुरंधर २'चे कौतुक केले. याआधी 'धुरंधर २' मधील 'आरी आरी' या गाण्याच्या लाँचवेळी खरे धुरंधर हे प्रेक्षक असल्याचे मत अभिनेत्री साराने व्यक्त केले होते.


राम गोपाल वर्मा हा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तसेच नवनवे धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी, कन्नड, तेलुगु भाषेच चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर, दाक्षिणात्य फिल्मफेअर, आय.आय.एफ.ए. असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले आहेत. शिवा, रंगीला, सत्या, शूल, जंगल, कंपनी, भूत, अब तक छप्पन, सरकार हे राम गोपाल वर्माचे प्रचंड लोकप्रिय झालेले निवडक चित्रपट आहेत.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा