केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : महागाई भत्ता ऑक्टोबरमध्ये ३% ने वाढणार

नवी दिल्ली (प्रतिनिधी):


सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेट देणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये ३% वाढ जाहीर करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशभरातील १.२ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होईल. त्याची औपचारिक घोषणा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. यावेळी सरकार दिवाळीच्या वेळी ही घोषणा करेल. जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त दिलासा मिळू शकेल. दुरुस्तीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू मानली जाईल, म्हणजेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळेल, जी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाणार आहे. केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिली सुधारणा होळीपूर्वी दुसरी सुधारणा दिवाळीपूर्वी. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने दिवाळीच्या सुमारे २ आठवडे आधी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा