उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३ मध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाला. बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे अश्विनी केदारी ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण २८ ऑगस्ट पासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर दहा दिवसांनी संपली. अश्विनी केदारी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या.


पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात अश्विनी केदारी यांच्यावर उपचार सुरू होते. पण गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांच्याकडून उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अश्विनी केदारी यांची दहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.


पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी भविष्यात जिल्हाधिकारी होता यावे म्हणून प्रशासकीय परीक्षेची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. पण भलतच घडलं. पहाटे अभ्यासासाठी उठलेल्या अश्विनी केदारी यांनी घोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता. अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोडा वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी जास्त गरम झालं होतं. हिटर बंद करुन बालदी उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनी केदारी पाय घसरुन पडल्या. या अपघातात त्यांचं शरीर ८० टक्के भाजले होते. गंभीररित्या भाजल्यामुळे वाचणे कठीण असल्याची जाणीव आधीच झाली होती पण डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. हे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.


Comments
Add Comment

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त