मंगळवारपासून सुरू होणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, कधी होणार भारताचा पहिला सामना ?


अबुधाबी : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धा मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना बुधवार १० सप्टेंबर रोजी आहे. संयुक्त अरब आमिराती अर्थात यूएई विरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहेत.



आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील भारताचे साखळी सामने


(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार)



  1. बुधवार १० सप्टेंबर २०२५ - भारत वि. यूएई - दुबई

  2. रविवार १४ सप्टेंबर २०२५ - भारत वि. पाकिस्तान - दुबई

  3. शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ - भारत वि. ओमान - अबुधाबी


आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग


Comments
Add Comment

Hockey Asia Cup 2025: चीनला हरवून भारत ९ व्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत

चीनवर ७-० असा एकेरी विजय मिळवत भारत जेतेपदाच्या लढतीत, दक्षिण कोरियाशी भिडणार बिहार: हॉकी आशिया कपमधील सुपर-४

महिला क्रिकेट विश्वचषक: पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही, भारत-पाक सामन्यांबाबत नवा नियम

नवी दिल्ली: भारतामध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात पाकिस्तानचा संघ सहभागी

ISPL 2025 : ISPL चं ऐतिहासिक पाऊल : टेनिस-बॉल क्रिकेटसाठी राष्ट्रीय स्पर्धात्मक आराखडा आणि झोनल पॅनल रचना लागू

मुंबई : भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ने मोठा निर्णय

संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून

आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात चुरस!

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल

आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला.