'शब्दांची हेराफेरी केली', भुजबळांचा सरकारला थेट इशारा; 'हैदराबाद गॅझेट'वरून आक्रमक

मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या 'हैदराबाद गॅझेट'च्या जीआरवरून राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर हा जीआर ओबीसी समाजासाठी धोकादायक असल्याचे मत भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट आपल्याच सरकारला इशारा दिला असून, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा संकेतही दिला आहे.


भुजबळ म्हणाले, "तासाभरात दोन-दोन जीआर निघतात. 'सरसकट' या शब्दावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, म्हणून तो शब्द काढून शब्दांची हेराफेरी केली गेली." याच कारणामुळे जरांगे पाटील परत गेले आणि त्यांनी विजयाचा गुलाल उधळला, असेही त्यांनी सांगितले.



ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार?


ओबीसी आरक्षणाचे नेते म्हणून ओळखले जाणारे भुजबळ, या जीआरमुळे ओबीसी समाजाचे मोठे आणि कधीही भरून न निघणारे नुकसान होईल अशी भीती व्यक्त करत आहेत. "मराठ्यांना ओबीसींमध्ये सरसकट आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे," असा त्यांचा आरोप आहे.


यावर बोलताना त्यांनी २०१७ नंतरच्या घटनाक्रमांचा संदर्भ दिला. "२०१९ पूर्वी मराठा, गुज्जर आणि जाट समाजाचे मोर्चे निघाले होते. त्यानंतर मोदी सरकारने ईडब्ल्यूएस (EWS) वर्ग निर्माण केला. ज्या समाजांना सामाजिकदृष्ट्या मागास मानले जात नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना ५० टक्क्यांच्या बाहेर १० टक्के आरक्षण दिले. पण, १० टक्क्यांत एकटा मराठा समाजच ८ टक्के आहे. तरीही त्यांचा ओबीसी आरक्षणासाठी आग्रह कायम आहे. तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने आणखी १० टक्के आरक्षण दिले, तरीही त्यांना ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे," असे भुजबळ म्हणाले.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली, मिळाली थेट पुढील वर्षाची 'डेट'

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच 'अपात्रते'वर फैसला होण्याची शक्यता नवी दिल्ली

भुसावळ-महानगरी एक्सप्रेसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआयचे संदेश

महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी

Amravati News : थरकाप उडवणारा व्हिडिओ! लग्नसोहळ्यात स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार; नवरी जागीच बेशुद्ध

अमरावती : लग्न समारंभ म्हटला की, आनंद, जल्लोष आणि आयुष्यभराच्या नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र, अमरावती (Amravati

पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक

पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आणि तापमानाचा पारा गोठत चालला आहे त्यामुळे साक्षात

राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही