मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी?

मुंबई : मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कोणत्या महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागते. सध्याच्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची नियुक्ती आता माहिम मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्षपद रिक्त असून यासाठी चर्चेत असणारी बहुतांशी सर्वच नावे मागे पडली आहेत. त्यामुळे आता या पदावर माजी नगरसेविकांपैंकी कुणाला संधी दिली जाते की महिला पदाधिकाऱ्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई भाजपमध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची निवड नेहमीच महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या रिक्त पदासाठी अनेक अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. सध्या या पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. यामध्ये अनेक विद्यमान नगरसेविका आणि अनुभवी महिला नेत्यांचा समावेश आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या आणि महिलांमध्ये चांगली पकड असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यात काही नवी नावे सुद्धा पुढे येत आहेत, जी नव्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने पक्षाला नवी दिशा देऊ शकतात.


सुरुवातीला या पदासाठी शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर, राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, रितु तावडे, योजना ठोकळे, आशा मराठे आणि प्रीती सातम यांची नार्वे चर्चेत होती. परंतु त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना ठोकळे, राजेश्री शिरवडकर यांची नावे शिल्लक असली तरी या नवनिर्वाचित मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी तेवढ्याच तोडीची आणि अभ्यासू तथा आक्रमक महिला अध्यक्षाची निवड करणे आवश्यक असेल. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चेतील नावांव्यतिरिक्त अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाबाबत मंथन सुरू असून लवकरच नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार