मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी?

मुंबई : मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कोणत्या महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागते. सध्याच्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची नियुक्ती आता माहिम मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्षपद रिक्त असून यासाठी चर्चेत असणारी बहुतांशी सर्वच नावे मागे पडली आहेत. त्यामुळे आता या पदावर माजी नगरसेविकांपैंकी कुणाला संधी दिली जाते की महिला पदाधिकाऱ्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई भाजपमध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची निवड नेहमीच महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या रिक्त पदासाठी अनेक अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. सध्या या पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. यामध्ये अनेक विद्यमान नगरसेविका आणि अनुभवी महिला नेत्यांचा समावेश आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या आणि महिलांमध्ये चांगली पकड असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यात काही नवी नावे सुद्धा पुढे येत आहेत, जी नव्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने पक्षाला नवी दिशा देऊ शकतात.


सुरुवातीला या पदासाठी शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर, राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, रितु तावडे, योजना ठोकळे, आशा मराठे आणि प्रीती सातम यांची नार्वे चर्चेत होती. परंतु त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना ठोकळे, राजेश्री शिरवडकर यांची नावे शिल्लक असली तरी या नवनिर्वाचित मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी तेवढ्याच तोडीची आणि अभ्यासू तथा आक्रमक महिला अध्यक्षाची निवड करणे आवश्यक असेल. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चेतील नावांव्यतिरिक्त अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाबाबत मंथन सुरू असून लवकरच नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)