खरे शहाणे

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


जीवनविद्येचे कार्य क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक म्हणजे काय तर लोकांची मानसिकता बदलणे ही क्रांती आहे. एखाद्याची मानसिकता बदलली व तो सत्तेवर गेला की तो लोकांचे भलेच करणार, कारण त्याला कळलेले आहे की लोकांचे भले करण्यांतच आपले भले आहे व लोकांचे वाईट होण्यात आपले वाईट आहे. हे एकदा त्याला कळले की त्याची मानसिकता बदलेल. वास्तविक हे त्यांना अनुभवातून जाणले पाहिजे. अनुभवातूनच शिकले पाहिजे.


जीवनविद्येचा एक अमृततुषार आहे “जो दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो तो खरा शहाणा, जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो दीड शहाणा व जो कुणाच्याच अनुभवातून शिकत नाही तो पेडगावचा शहाणा “. गंमत अशी आहे की, दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणे महत्वाचे आहे. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो ते खरे शहाणपण. पण आज लोक म्हणतात की आम्ही स्वतः अनुभव घेणार व शिकणार. एक घडलेली गोष्ट सांगतो. आमचेच एक नातेवाइक, त्यांच्या मुलाला एक मुलगी सांगून आलेली. त्या मुलीच्या घराण्याबद्दल ते भांडखोर आहेत हे प्रसिद्ध होते. मुलाच्या आईवडिलांनी मुलाला सांगितले, अरे गावात या मुलीच्या घराण्याची ते भांडखोर आहेत अशी प्रसिद्धी आहे तर तू ही मुलगी करू नको. या मुलामुलींचे रेल्वेतून जातायेता सूत जुळलेले. मुलगा म्हणाला मी अनुभव घेऊन पाहतो. लग्न केले व जो अनुभव यायचा तो आलाच.


हे सांगण्याचे कारण इतकेच की, लोक स्वतःच्याच अनुभवावरून शिकणार म्हणतात म्हणून ते दीड शहाणे. हे शहाणपण अगदी शेवटी सुचते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काय उपयोग. शिकायचे असते ते तरुणपणी. जीवनविद्येचे हे जे ज्ञान आहे ते तरुणपणी शिकायचे असते किंबहुना हे बालपणी मिळाले पाहिजे. बालपणीच जर त्याला हे संस्कार मिळाले तर तो पुढे काहीतरी करून दाखविले. हे जे काही मी सांगतो आहे ते संस्कार म्हणजे परमेश्वराबद्दलचे ज्ञान. आज गंमत अशी आहे की परमेश्वर ही संकल्पनाच लोकांना नकोशी झालेली आहे व त्याचेच दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत म्हणून जीवनविद्येने परमेश्वर हा विषय घेतलेला आहे. काहीही घडले तर परमेश्वराला रिटायर्ड करा किंवा परमेश्वर नको किंवा नाहीच म्हणणे हा उपाय नाही. परमेश्वरबद्दलचे अज्ञानच सर्व दुःखाला कारणीभूत आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. व्याधी झाली तर माणसाला मारून टाका म्हणणे हा उपाय नाही. माणसाला मारून व्याधी कशी जाईल. व्याधी जाण्यासाठी त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे उपचार केले पाहिजे. म्हणूनच योग्यवेळी “परमेश्वर हाच आपल्या जीवनाचे मूळ आहे व तोच आपल्या जीवनाचे फळ आहे.” या ज्ञानाचे संस्कार झाले पाहिजेत.

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा