"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर सामन्यांच्या खिशाला कात्री लावून जातात. गेले कित्येक वर्षांपासून वाढत चाललेली ही सामन्य माणसांची ही आर्थिक चणचण आता काहीप्रमाणात कमी होणार आहे. कारण. महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जखमावर अखेरीस केंद्र सरकारने मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यात सामान्यांच्या हितावह अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिकिया देखील समोर आली. 'दिलेला शब्द मी पाळला, जे बोललो होतो ते करून दिले" असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले आहे.

जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल


२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीच्या करप्रणालीमध्ये अखेरीस बदल करण्यात आला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आता याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल' अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती


जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले पंतप्रधान मोदी?





"'स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी म्हटलं होतं की, आम्ही जीएसटीमध्ये पुढील पिढीसाठी सुधारणा आणण्याचा मानस करतो. केंद्र सरकारने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये व्यापक जीएसटी दरांचे तार्किक पुनर्रचना आणि प्रक्रिया सुधारणांचा समावेश आहे. त्याचे उद्दिष्ट सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

तसंच, 'जीएसटी कौन्सिल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही समाविष्ट आहेत, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात आणि सुधारणांचे प्रस्ताव एकत्रितपणे मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुनिश्चित होईल' अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak : अखेर BCCI समोर झुकला नक्वी! ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या नक्कावींचा माज उतरला, नक्की काय म्हणाला मोहसीन नक्वी?

दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI)

PM Modi RSS 100th Year : भारतीय मुद्रेवर 'भारत मातेचे' चित्र; RSS शताब्दीनिमित्त मोदींनी उलगडले विशेष नाणे-तिकिटाचे रहस्य! काय म्हणाले PM मोदी?

नवी दिल्ली : आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन

आरएसएसच्या शताब्दी वर्षांत देशभर कार्यक्रमांचे आयोजन

संघ विचाराच्या प्रसारासाठी स्वयंसेवक घरोघरी जाणार मोहन भागवत परदेशातही जाणार माजी राष्ट्रपती रामनाथ

अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे देणार ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाने नाराजीचा स्फोट नवी दिल्ली : अमेरिकेत ३० सप्टेंबर रोजी तब्बल १ लाख

आजपासून बदलले 'हे' मोठे नियम! एलपीजी दरात वाढ, रेल्वे तिकीट बुकिंगसह अनेक नियमांत बदल

मुंबई: आज, १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वपूर्ण नियम लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य