"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर सामन्यांच्या खिशाला कात्री लावून जातात. गेले कित्येक वर्षांपासून वाढत चाललेली ही सामन्य माणसांची ही आर्थिक चणचण आता काहीप्रमाणात कमी होणार आहे. कारण. महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जखमावर अखेरीस केंद्र सरकारने मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यात सामान्यांच्या हितावह अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिकिया देखील समोर आली. 'दिलेला शब्द मी पाळला, जे बोललो होतो ते करून दिले" असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले आहे.

जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल


२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीच्या करप्रणालीमध्ये अखेरीस बदल करण्यात आला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आता याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल' अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती


जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले पंतप्रधान मोदी?





"'स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी म्हटलं होतं की, आम्ही जीएसटीमध्ये पुढील पिढीसाठी सुधारणा आणण्याचा मानस करतो. केंद्र सरकारने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये व्यापक जीएसटी दरांचे तार्किक पुनर्रचना आणि प्रक्रिया सुधारणांचा समावेश आहे. त्याचे उद्दिष्ट सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

तसंच, 'जीएसटी कौन्सिल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही समाविष्ट आहेत, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात आणि सुधारणांचे प्रस्ताव एकत्रितपणे मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुनिश्चित होईल' अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले