मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे.


महाराष्ट्र शासनाने २०२५ साठी राज्यासाठी २४ सार्वजनिक सुट्या डिसेंबर २०२४ मध्येच जाहीर केल्या आहेत. जेव्हा सुट्यांची घोषणा अधिसूचित करण्यात आली त्यावेळी ईद-ए-मिलादची सुटी संपूर्ण राज्यासाठी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ या दिवशीच जाहीर करण्यात आली होती. पण यंदा मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५ ची ईदची सुटी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने विशेष अधिकाराचा वापर करुन सुटीत बदल केला आहे.


ईदचा सण उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा. तसेच या आनंद सोहळ्यात अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.


ईद-ए-मिलाद हा धार्मिक सण मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र जमून साजरा करतात. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पण ६ सप्टेंबर २०२५ रोजी रविवारी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण आहे. यामुळेच मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र