मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण


मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोच्या माध्यमातून जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो ४ च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरच्या मार्गापैकी ६.९० किलोमीटरवर गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग आला आहे.


ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. गर्डरची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानके उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरपैकी ६.९० किलोमीटरच्या मार्गावरील गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.


या कामांमध्ये प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल. मेट्रो ४ च्या मार्गात कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली या महत्वाच्या सहा स्थानकांचा समावेश आहे. या भागांमध्ये काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल.


ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दररोज प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.


Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास