मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण


मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोच्या माध्यमातून जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो ४ च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरच्या मार्गापैकी ६.९० किलोमीटरवर गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग आला आहे.


ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. गर्डरची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानके उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरपैकी ६.९० किलोमीटरच्या मार्गावरील गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.


या कामांमध्ये प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल. मेट्रो ४ च्या मार्गात कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली या महत्वाच्या सहा स्थानकांचा समावेश आहे. या भागांमध्ये काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल.


ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दररोज प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.


Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही