मुंबईत गौरी गणपतीला निरोप

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईतील विविध भागांतील भाविकांनी गौरी आणि गणपतीला निरोप दिला. आपल्या लाडक्या बाप्पासोबतच माहेरवाशिण आलेल्या गौराईला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलावांच्याठिकाणी भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी रात्री वाजेपर्यंत २६ हजार गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.
मंगळवारी गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघ्या मुंबापुरीचे रस्ते दुमदुमून गेले होते. एकच उत्साहाचे वातावरण चहुबाजुला पहायला मिळत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर ढोल आणि ताशांचाही तालावर प्रत्येक जण वाजत गाजत आणि नाचत बाप्पाला निरोप देत होते.

मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.

दीड दिवसा पर्यावरणपुरक आणि पीओपीच्या गणेशमूर्तींना समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास परवानगी नाकारल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढून जिथे शक्य नसेल तिथे पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, गौरीगणपतीसह शाडूमातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन ज्या भागांमध्ये कृत्रिम तलावांची सुविधा नाही तिथे महापालिकेच्यावतीने समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये करण्यास परवानगी दिली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू सह इतर ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असल्याने एमपीसीबीच्या परिपत्रकानुसार विसर्जनासाठी परवानगी दिली जात होती. रात्री नऊवाजेपर्यंत २५७ सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती २३२१६, गौरी २९२० अशाप्रकारे एकूण २६,३९६ गौरी आणि गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांसह काही समुद्रासह तलावांमध्ये विसर्जन करण्यात पार पडले होते.
Comments
Add Comment

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या

पाकच्या अबरार अहमदला भारताच्या क्रिकेटर्सनी त्याच्याच भाषेत दिले उत्तर, व्हिडिओ व्हायरल

सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी केली पाकिस्तानी गोलंदाजाची नक्कल; व्हिडिओ व्हायरल दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम

Health: निरोगी हृदयासाठी 'हे' ड्राय फ्रूट्स आहेत खूप फायदेशीर!

मुंबई: दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकारांबद्दल जनजागृती करणे हा या

पाकिस्तानला हरवल्यानंतर BCCIकडून टीम इंडियावर पैशांचा पाऊस, मिळणार इतके मोठे बक्षीस

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय

IND vs PAK: मैदानावरही ऑपरेशन सिंदूर!' पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर विजयानंतर केले खास ट्विट

नवी दिल्ली: भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर