पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर, २० लाख नागरिक झाले बेघर


पंजाब : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर आला आहे. या पुरामुळे २० लाख नागरिक बेघर झाले आहेत. प्रशासन नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने सुरक्षित ठिकाणी नागरिकांसाठी तात्पुरते कॅम्प सुरू केले आहेत. या ठिकाणी बेघर झालेल्यांची सोय करण्यात आली आहे.


आतापर्यंत अनेक पूर आले पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पूर आहे. यामुळे संपूर्ण प्रांताची व्यवस्था पुरती कोलमडली आहे. पहिल्यांदाच सतलुज, चिनाब आणि रावी या तीन नद्यांना एकाचवेळी पूर आला आहे. यामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना प्रशासनाची पुरती दमछाक झाल्याचे चित्र आहे.


भारताने मागच्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या अंदाजांच्या आधारे पाकिस्तानला महापुराच्या संकटाची माहिती देऊन सावध केले होते. पण पाकिस्तानने पुरेशी खबरदारी घेतली नाही. यामुळे पुराने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या १५ कोटी आहे. यापैकी २० लाख नागरिकांचे पुरामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा कृषीप्रधान आहे. पाकिस्तानमध्ये गव्हाचे सर्वाधिक उत्पादन याच पंजाब प्रांतात होते. याआधी २०२२ मध्ये पुरामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गहू शेतीला मोठा फटका बसला होता. आता महापुरामुळे पुन्हा एकदा गव्हाच्या वार्षिक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा १ जुलै ते २७ ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मागच्या वर्षींच्या तुलनेत २६.५ टक्के जास्त पाऊस पडला. मुल्तानमध्ये प्रशासनाने बांध फोडण्यासाठी पाच ठिकाणी स्फोटके बसवली आहेत. थोड्याच वेळात बांध फोडून पाणी शहरांपासून दूर दुसऱ्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.


पुराचे संकट मोठे आहे. आता पाणी अडवणे अशक्य आहे पण पाणी दुसऱ्या दिशेला वळवून मोठ्या नागरी वस्तीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी महिती प्रशासनाने दिली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुरामुळे आतापर्यंत ८४९ मृत्यू झाले असून ११३० जण जखमी झाले आहेत. सरकारी शिबिरांमध्ये लाखो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. आणखी काही जणांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.


Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल