Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली जरी असली तरी, आजपासून ते पाणीदेखील पिणार नसल्याची घोषणा त्यांनी कालच्या आंदोलनात केली. त्यांच्या या पवित्र्यानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय अधिक काळ ताणू इच्छित नाही, आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल रात्री उशिरा वर्षावर महत्वाची बैठक केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? आणि काय निर्णय झाला, याचा खुलासा आज होण्याची शक्यता आहे.


काल रात्री उशिरा झालेली ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या चर्चेतून काही ठोस तोडगा निघतो का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.



मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्यरात्री तातडीची बैठक


उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत थेट मुंबई गाठली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले होते. मात्र, ते देखील काल रात्री वर्षा बंगल्यावर उपस्थित राहिले.


Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि