चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे  बसमध्ये आग लागली, त्यामुळे इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.

महाराष्ट्रातील जालना येथून एक भयानक घटना समोर आली आहे. येथील बदनापूर येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओटीन घेत पेटवून दिले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत प्रवाशाचे नाव सुनील सज्जनराव टाले असे सांगण्यात येत आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसीलमधील आरेगाव गावचा रहिवासी होता.

नेमके काय आहे प्रकरण?


पुण्याहून पुसेदकडे जाणारी ट्रॅव्हल्स एमपी ०९ डीपी ९९२५ ही बस बदनापूर परिसरातून जात असताना अचानक बसमध्ये जळण्याचा वास येऊ लागला. प्रवाशांनी चौकशी केली असता, १२ क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. यादरम्यान, बदनापूरजवळील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ चालकाने तात्काळ बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत सदर व्यक्ति चांगलीच जळाली होती. इतकेच नव्हे तर आगीमुळे बसचे देखील अतोनात नुकसान झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्याच्याजवळ सापडलेल्या सामानावरून मृताची ओळख पटली आणि कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, सुनील ताले यांनी स्वतःला जाळून का घेतले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बदनापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि दहशतीचे वातावरण आहे.
Comments
Add Comment

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर