Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट


नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या मोठ्या घरापर्यंतचा प्रवास... अशी सुंदर संकल्पना असणारा देखावा नायगाव दादर बी.डी.डी.मध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे.


नायगाव-दादर बी.डी.डी. चाळीतल्या १०x१० च्या छोट्याशा खोलीत आमचं बालपण फुललं. त्या एका खोलीतच आमचं हसणं, खेळणं, अभ्यास, भांडणं आणि प्रत्येक सणाचा उत्सव रंगायचा. गणपती असो, नवरात्र असो वा दिवाळी—सगळं चाळीतल्या शेजाऱ्यांसोबत मनमोकळेपणानं साजरं व्हायचं. जागा कमी होती, पण मनं मात्र प्रचंड मोठी होती.


आज आम्हाला नवीन २ बीएचके घर मिळालं आहे. अभिमान, आनंद आणि समाधान आहे; पण तरीही त्या चाळीतील दिवस विसरणं कठीण आहे. बालपणीची धावपळ, एकमेकांना दिलेला आधार, आणि शेजाऱ्यांशी असलेलं ममत्व अजूनही मनात जिवंत आहे.



यंदाच्या गणेश सजावटीतून आम्ही आमचा हा प्रवास मांडला आहे—लहान चाळीच्या खोलीतून मोठ्या घरापर्यंतचा. जुन्या आठवणींना उजाळा देत, नवीन आयुष्याचं स्वप्न बाप्पाच्या चरणी अर्पण केलं आहे. प्रत्येक टप्प्यावर बाप्पाची साथ लाभली म्हणूनच हा बदल शक्य झाला.


आज नवीन घरात आहोत, पण जुन्या दिवसांच्या गोड आठवणी अजूनही हृदयाला हळवं करतात. त्यामुळे ही सजावट आमच्यासाठी फक्त सजावट नाही, तर आमच्या आयुष्याची खरी कहाणी आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .