डुकरांच्या रक्षणासाठी कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार

प्रशांत कोठावदे । सटाणा : तालुक्यातील अंबासन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुक्करांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत काही मांजरांचाही बळी गेला आहे. ही घटना गावातील अंगणवाडी केंद्राजवळ व चौकात घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे की, डुक्कर मालकाने आपली डुकरे सुरक्षित राहावेत यासाठी गावात काहीतरी विषारी पदार्थ टाकून कुत्र्यांना ठार मारण्याचे कृत्य केले. या प्रकारामुळे गावातील नागरिकांनी व प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात स्वतः डुक्कर मालकाने पोलीस ठाण्यात कबुली दिली आहे. परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी विषारी अन्न खाल्ले आणि काही वेळातच तडफडून मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते. त्यामुळे या दृश्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली. जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डी एस. पठाडे यांनी कुत्र्यांचे शवविच्छेदन केले.

ग्रामपंचायतीच्या आवारात दरवेळी ग्रामसभेत गावानजीकचे शेतकरी शेतीचे नुकसान करणाऱ्या डुकरांचा प्रश्न उपस्थित करत होते. मात्र डुक्कर मालकांकडून कुठलाही बंदोबस्त केला जात नव्हता. ग्रामसभेतही याबाबत नेहमीच साधकबाधक चर्चा होत होत्या. सदर डुक्कर मालकांनी सात दिवसांत गावातील डुक्कर हद्दपार करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments
Add Comment

राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली