मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, ढोल ताशाच्या निनादात गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई: दिनांक २७ ऑगस्टपासून (Ganesh Chaturthi 2025) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणखीन काही दिवस राज्यभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.


अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.  मुंबईच्या चौपाट्यांवर तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात  रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहिले.


यादरम्यान, गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईच्या प्रमुख चौपाट्यांवर आणि तलावावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  ज्यात विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी कुंड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


ज्येष्ठा गौरी पूजन


आज घरगुती पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, पण आज अनेकांच्या घरी गौराईचे आगमन झाले आहे, त्यानुसार उद्या अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन साजरा केला जाणार असून, तिसऱ्या दिवशी   म्हणजे मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींसोबत विसर्जन केले जाईल. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय