Maratha Andolan : आज दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू, पावसाचा जोर वाढला

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आझाद मैदात त्यांचे हे आंदोलन सुरू असून पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आधी या आंदोलनासाठी फक्त शुक्रवारीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी शनिवारसाठी वाढवण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली.


दरम्यान, या आंदोलनासाठी काही कडक नियम तसेच अटी पोलिसांकडून लादण्यात आल्या आहेत. या आंदोलनासाठी सरकारने संख्या मर्यादा ठरवली आहे. ही मर्यादा ५ हजारांच्या आत ठेवावी अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी परिसरात गर्दी केली होती. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.



पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगताना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला