Maratha Andolan : आज दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू, पावसाचा जोर वाढला

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आझाद मैदात त्यांचे हे आंदोलन सुरू असून पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आधी या आंदोलनासाठी फक्त शुक्रवारीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी शनिवारसाठी वाढवण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली.


दरम्यान, या आंदोलनासाठी काही कडक नियम तसेच अटी पोलिसांकडून लादण्यात आल्या आहेत. या आंदोलनासाठी सरकारने संख्या मर्यादा ठरवली आहे. ही मर्यादा ५ हजारांच्या आत ठेवावी अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी परिसरात गर्दी केली होती. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.



पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगताना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.

Comments
Add Comment

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व