Maratha Andolan : आज दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू, पावसाचा जोर वाढला

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आझाद मैदात त्यांचे हे आंदोलन सुरू असून पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आधी या आंदोलनासाठी फक्त शुक्रवारीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी शनिवारसाठी वाढवण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली.


दरम्यान, या आंदोलनासाठी काही कडक नियम तसेच अटी पोलिसांकडून लादण्यात आल्या आहेत. या आंदोलनासाठी सरकारने संख्या मर्यादा ठरवली आहे. ही मर्यादा ५ हजारांच्या आत ठेवावी अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी परिसरात गर्दी केली होती. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.



पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगताना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती