गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान

  31

चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असण्याची अपेक्षा 


मुंबई: गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा सणासुदीचा कालावधी भारतातील गृहनिर्माण बाजारातील मागणीस नेहमीच चालना देतो आणि वार्षिक विक्रीत जवळपास एकतृतीयांश वाटा उचलतो. २०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणा सुदीच्या हंगामात बाजारपेठेत नव्या उत्साहाची लाट आहे. विकासक एकापाठोपाठ महत्त्वाचे प्रकल्प लॉन्च करत असून आकर्षक ऑफर्स सादर करत आहेत, तर खरेदीदारही आपल्या निर्णयाला पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत. मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सा तत्यपूर्ण मागणी, ग्राहकांच्या आत्मविश्वासात झालेली लक्षणीय वाढ आणि जीवनशैलीवर आधारित निवास प्रकल्पांकडे वाढलेले आकर्षण अशा सकारात्मक घटकांचा संगम हे सणासुदीचा मोसम वरदान ठरण्याचे प्रमुख कारण आहे. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत के वळ मोसमी पुनरुज्जीवन होणार नाही, तर या काळात निर्माण झालेली गती २०२६ पर्यंत गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीस चालना देईल, असा विश्वास आरईए इंडियाचे (हाऊसिंग डॉटकॉम) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केला. भारतातील गृहनिर्मा ण बाजाराने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत तुलनेने मंदी अनुभवली. सलग दोन वर्षांच्या दमदार वृद्धीनंतरचा हा दुरुस्तीचा टप्पा होता. मात्र, ऐतिहासिक प्रवाह दर्शवितो की सप्टेंबर ते डिसेंबरमधील सणासुदीची तिमाही मागणीत नेहमीच सुधारणा घडवते आणि यं दाही तोच कल कायम राहील, अशी अपेक्षा आहे.


हाऊसिंग डॉटकॉम आउटलुकनुसार गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी घरांच्या विक्रीसाठी सर्वाधिक मजबूत ठरला आहे. या काळात विकासक नवीन प्रकल्प लॉन्च करून आकर्षक ऑफर्स आणि मार्केटिंग मोहिमा राबवतात, तर खरेदीदार मोठ्या खरेदीची योजना आखतात. त्यामुळेच चौथी तिमाही वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने निर्णायक मानली जाते.गेल्या पाच वर्षांत (२०२०-२४) चौथ्या तिमाहीतील विक्रीने वार्षिक एकूण विक्रीत २५ ते ३० टक्के वाटा उचलला असून, ती प्रत्येक वर्षातील सर्वात दमदार तिमाही ठरली आहे. अगदी आव्हानात्मक काळातही (उदा. २०२० – कोव्हिडनंतरचा कालावधी) चौथ्या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३२ % वाढ नोंदली गेली असून, हीच सणासुदीच्या मोसमाची खरी ताकद मानली जाते. बहुतांश वर्षांत स णासुदीच्या मोसमातून मिळालेल्या चालनेमुळे तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १० ते १५ टक्के अधिक व्यवहार नोंदले जातात.


मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे ही तिमाही पुन्हा एकदा सर्वाधिक दमदार ठरणार आहे. २०२५ ची पहिली सहामाही सं थ राहिली असली तरी चौथ्या तिमाहीत विकासक नवीन प्रकल्प लॉन्च आणि आकर्षक योजना सादर करून बाजारपेठेला नव्या गतीची अपेक्षित चालना देतील.

Comments
Add Comment

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई

रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण

जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे