मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ

  39


मुंबई : महाराष्ट्रातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात

बीएमसीकडून आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा

मुंबई : मराठा समाजबांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका

शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाहीच

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण

Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा अरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : “मराठ्यांचं पाणी बंद केलं तर आयुक्तांना सुट्टी नाही!” BMC आयुक्तांना जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले,“कधी ना कधी हिशोब होणारच”...फक्त नाव लिहून ठेवा!

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन (Maratha