शिखर परिषदेसाठी जपानमध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी, टोकियोच्या एअरपोर्टवर जोरदार स्वागत

टोकियो: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोच्या हानेडा एअरपोर्टवर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी २८ ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते. जाण्याआधी त्यांनी हा विश्वास दाखवला की हा दौरा भारताच्या हितांना पुढे नेण्यासाठी मदत करेल. सोबतच क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि आपसातील सहकार्य वाढवण्यास मदत करेल.


दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी २९ आणि ३० ऑगस्टला जपानमध्ये राहतील. त्यानंतर ते चीनला जातील. ते जपानमध्ये दोन्ही देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील, त्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही ते उपस्थित राहतील.


पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले की, 'जपानमध्ये मी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत भारताची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढील स्तरावर घेऊन जाण्यावर लक्ष केंद्रित करीन.' त्यांनी म्हटले की, गेल्या 11 वर्षांमध्ये या भागीदारीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे आर्थिक आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्यावर, तसेच AI आणि सेमीकंडक्टरसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की, ही भेट भारत आणि जपानमधील प्राचीन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी देईल.


जपानहून पंतप्रधान मोदी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी रवाना होतील. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून या परिषदेत सहभागी होत आहेत. या दौऱ्यात त्यांना शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका करण्याची अपेक्षा आहे.


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'भारत एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे आणि आम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या काळात नाविन्य, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रात अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत.'


त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा दौरा भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि प्राधान्यांना पुढे घेऊन जाईल आणि प्रादेशिक तसेच जागतिक शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी फलदायी सहकार्याला हातभार लावेल.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४