शिखर परिषदेसाठी जपानमध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी, टोकियोच्या एअरपोर्टवर जोरदार स्वागत

टोकियो: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोच्या हानेडा एअरपोर्टवर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी २८ ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते. जाण्याआधी त्यांनी हा विश्वास दाखवला की हा दौरा भारताच्या हितांना पुढे नेण्यासाठी मदत करेल. सोबतच क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि आपसातील सहकार्य वाढवण्यास मदत करेल.


दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी २९ आणि ३० ऑगस्टला जपानमध्ये राहतील. त्यानंतर ते चीनला जातील. ते जपानमध्ये दोन्ही देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील, त्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही ते उपस्थित राहतील.


पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले की, 'जपानमध्ये मी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत भारताची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढील स्तरावर घेऊन जाण्यावर लक्ष केंद्रित करीन.' त्यांनी म्हटले की, गेल्या 11 वर्षांमध्ये या भागीदारीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे आर्थिक आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्यावर, तसेच AI आणि सेमीकंडक्टरसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की, ही भेट भारत आणि जपानमधील प्राचीन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी देईल.


जपानहून पंतप्रधान मोदी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी रवाना होतील. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून या परिषदेत सहभागी होत आहेत. या दौऱ्यात त्यांना शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका करण्याची अपेक्षा आहे.


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'भारत एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे आणि आम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या काळात नाविन्य, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रात अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत.'


त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा दौरा भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि प्राधान्यांना पुढे घेऊन जाईल आणि प्रादेशिक तसेच जागतिक शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी फलदायी सहकार्याला हातभार लावेल.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक