शिखर परिषदेसाठी जपानमध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी, टोकियोच्या एअरपोर्टवर जोरदार स्वागत

टोकियो: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोच्या हानेडा एअरपोर्टवर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी २८ ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते. जाण्याआधी त्यांनी हा विश्वास दाखवला की हा दौरा भारताच्या हितांना पुढे नेण्यासाठी मदत करेल. सोबतच क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि आपसातील सहकार्य वाढवण्यास मदत करेल.


दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी २९ आणि ३० ऑगस्टला जपानमध्ये राहतील. त्यानंतर ते चीनला जातील. ते जपानमध्ये दोन्ही देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील, त्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही ते उपस्थित राहतील.


पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले की, 'जपानमध्ये मी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत भारताची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढील स्तरावर घेऊन जाण्यावर लक्ष केंद्रित करीन.' त्यांनी म्हटले की, गेल्या 11 वर्षांमध्ये या भागीदारीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे आर्थिक आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्यावर, तसेच AI आणि सेमीकंडक्टरसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की, ही भेट भारत आणि जपानमधील प्राचीन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी देईल.


जपानहून पंतप्रधान मोदी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी रवाना होतील. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून या परिषदेत सहभागी होत आहेत. या दौऱ्यात त्यांना शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका करण्याची अपेक्षा आहे.


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'भारत एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे आणि आम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या काळात नाविन्य, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रात अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत.'


त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा दौरा भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि प्राधान्यांना पुढे घेऊन जाईल आणि प्रादेशिक तसेच जागतिक शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी फलदायी सहकार्याला हातभार लावेल.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या