शिखर परिषदेसाठी जपानमध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी, टोकियोच्या एअरपोर्टवर जोरदार स्वागत

टोकियो: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोच्या हानेडा एअरपोर्टवर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी २८ ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते. जाण्याआधी त्यांनी हा विश्वास दाखवला की हा दौरा भारताच्या हितांना पुढे नेण्यासाठी मदत करेल. सोबतच क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि आपसातील सहकार्य वाढवण्यास मदत करेल.


दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी २९ आणि ३० ऑगस्टला जपानमध्ये राहतील. त्यानंतर ते चीनला जातील. ते जपानमध्ये दोन्ही देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील, त्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही ते उपस्थित राहतील.


पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले की, 'जपानमध्ये मी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत भारताची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढील स्तरावर घेऊन जाण्यावर लक्ष केंद्रित करीन.' त्यांनी म्हटले की, गेल्या 11 वर्षांमध्ये या भागीदारीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे आर्थिक आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्यावर, तसेच AI आणि सेमीकंडक्टरसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की, ही भेट भारत आणि जपानमधील प्राचीन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी देईल.


जपानहून पंतप्रधान मोदी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी रवाना होतील. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून या परिषदेत सहभागी होत आहेत. या दौऱ्यात त्यांना शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका करण्याची अपेक्षा आहे.


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'भारत एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे आणि आम्ही आमच्या अध्यक्षपदाच्या काळात नाविन्य, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रात अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत.'


त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा दौरा भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि प्राधान्यांना पुढे घेऊन जाईल आणि प्रादेशिक तसेच जागतिक शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी फलदायी सहकार्याला हातभार लावेल.

Comments
Add Comment

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने