Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.


तसेच या आंदोलनाला आणखी एक वाढीव दिवस मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान प्रशासनानेही अतिशय सावधगिरीची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे आदेश सुट्टीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आले आहेत.


सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा तसेच गैरहजर असलेल्या पोलिसांनी तातडीने कामावर येण्याच्या सूचना या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे याचे नियोजन करताना पोलीसबळ अपुरे पडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री