Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.


तसेच या आंदोलनाला आणखी एक वाढीव दिवस मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान प्रशासनानेही अतिशय सावधगिरीची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे आदेश सुट्टीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आले आहेत.


सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा तसेच गैरहजर असलेल्या पोलिसांनी तातडीने कामावर येण्याच्या सूचना या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे याचे नियोजन करताना पोलीसबळ अपुरे पडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती