बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस


पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दरम्यान सुमारे 3 लाख मतदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नागरिकांची नागरिकता "संशयास्पद" असल्याचा संशय आहे.


बिहारमध्ये बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या संशयित मतदारांना बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमा लागून असलेल्या भागांतील निर्वाचन नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ईआरओ) या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या मदतारांच्या दस्तावेजांची पडताळणी करताना काही विसंगती आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.


या संशयित मतदारांची नावे 1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मसुदा मतदार यादीत प्रकाशित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जर हे मतदार भारतीय नागरिक असल्याचे योग्य कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी झाले, तर त्यांची नावे 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून वगळली जातील.


निवडणूक आयोग या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुद्धा करत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील 3 लाख लोकांची नागरिकता संशयास्पद आहे. अशा लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या मतदारांपैकी बरेच जण बांगलादेश आणि नेपाळ येथील असल्याचा संशय आहे. तर काहीजण म्यानमार आणि अफगाणिस्तान येथील असल्याचीही माहिती आहे. जिल्ह्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी केलेल्या क्षेत्र भेटीदरम्यान ही माहिती समोर आली, आणि त्यानंतर संबंधित ईआरओने नोटिसा जारी केल्या.


दस्तऐवज पडताळणीदरम्यान अनेक विसंगती आढळल्या, आणि त्यानंतर क्षेत्रीय चौकशी करून नोटिसा पाठवण्यात आल्या. पूर्वी चंपारण, पश्चिमी चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल हे जिल्हे अशा प्रकरणांसाठी विशेष लक्षात आले आहेत. ज्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी योग्य कागदपत्र सादर केली, तर त्यांची नावे मतदार यादीतून काढली जाणार नाहीत.


पण जर कोणी आवश्यक दस्तावेज सादर करण्यात अपयशी ठरले, तर त्यांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळली जातील आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईही होऊ शकते. यानंतर आयोगाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाला अहवाल देतील की हे मतदार गैर-भारतीय नागरिक असल्याचे आढळून आले आहेत.


Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या