'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळ बातचीत झाली. राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'राज को राज रहने दो' असे सूचक उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची माहिती देणे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.





राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आले होते. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी युती करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी बातचीत केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.





काही दिवसांपूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असूनही त्यांचा दारुण पराभव झाला. अनेक वर्षे बेस्ट पतपेढीची सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या समर्थकांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र