विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे,


या दुर्घटनेला २० तास उलटून गेले आहेत. इमारत कोसळल्याची दुर्घटनेची माहिती मिळताच या इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकांनी तातडीने येथे धाव घेतली होती. अनेकांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मृतांची नावे


लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष), सचिन निवळकर(४० वर्षे), सोनाली तेजाम(४१ वर्षे), दीपक सिंग बोहरा(२५ वर्षे), कशिश पव सहेनी(३५ वर्षे), शुभांगी पवन सहेनी(४० वर्षे), गोविंद सिंग रावत(२८ वर्षे), पार्वती सकपाळ(६० वर्षे)



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)



बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेने वसई-विरार परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शहरांमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, "रमाबाई अपार्टमेंट" सारख्या धोकादायक इमारतींमध्ये लोक का राहत होते आणि प्रशासनाने वेळोवेळी नोटीस देऊनही यावर कारवाई का केली नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित चुका आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली असल्याचे आरोप होत आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: