विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे,


या दुर्घटनेला २० तास उलटून गेले आहेत. इमारत कोसळल्याची दुर्घटनेची माहिती मिळताच या इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकांनी तातडीने येथे धाव घेतली होती. अनेकांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मृतांची नावे


लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष), सचिन निवळकर(४० वर्षे), सोनाली तेजाम(४१ वर्षे), दीपक सिंग बोहरा(२५ वर्षे), कशिश पव सहेनी(३५ वर्षे), शुभांगी पवन सहेनी(४० वर्षे), गोविंद सिंग रावत(२८ वर्षे), पार्वती सकपाळ(६० वर्षे)



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)



बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेने वसई-विरार परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शहरांमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, "रमाबाई अपार्टमेंट" सारख्या धोकादायक इमारतींमध्ये लोक का राहत होते आणि प्रशासनाने वेळोवेळी नोटीस देऊनही यावर कारवाई का केली नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित चुका आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली असल्याचे आरोप होत आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक