शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला


संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे घडली. हल्लेखोर संगमनेर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खताळ यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना संयम आणि शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.


संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे गणेशोत्सवानिमित्त संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खताळ कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम पार पडल्यानांतर नागरिकांना भेटत त्यांच्या वाहनाकडे जात असताना ग्रामीण भागातील एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरल्याने शेकडोंच्या संख्येने खताळ समर्थक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खताळ यांनी जमलेल्या सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.


समर्थकांनी आणि नागरिकांनी शांत राहावे, खताळ यांचे आवाहन


सदर घटना ही विकृत बुध्दीच्या लोकांनी केली आहे. ज्याने हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे आता कोणीही चुकीचे काम करायचे नाही. सर्वांनी संयम व शांततेची भूमिका पार पाडायची आहे. गणेश उत्सव असून आपल्याला हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करायचे नाही. सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन खताळ यांनी समर्थकांना केले.


Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "