सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठार


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ठार केले.





गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली. जवानांना बघताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.


याआधी २ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले.


पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला होता. या घटनेनंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये सात चकमकींमध्ये २३ दहशतवादी ठार झाले. आज ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. इतर २१ दहशतवाद्यांपैकी बारा पाकिस्तानी नागरिक होते तर नऊ स्थानिक होते. या व्यतिरिक्त ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.


Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे