सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठार


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ठार केले.





गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली. जवानांना बघताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.


याआधी २ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले.


पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला होता. या घटनेनंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये सात चकमकींमध्ये २३ दहशतवादी ठार झाले. आज ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. इतर २१ दहशतवाद्यांपैकी बारा पाकिस्तानी नागरिक होते तर नऊ स्थानिक होते. या व्यतिरिक्त ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.


Comments
Add Comment

‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यता जामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या

रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही

'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली  : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या

नियामक रचनेत फेरफार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिली लाच! ईडीच्या छापेमारीत प्रकरण आले उजेडात

मुंबई: विशिष्ट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसेच, राष्ट्रीय वैद्यकीय

लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर