सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठार


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ठार केले.





गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली. जवानांना बघताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.


याआधी २ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले.


पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला होता. या घटनेनंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये सात चकमकींमध्ये २३ दहशतवादी ठार झाले. आज ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. इतर २१ दहशतवाद्यांपैकी बारा पाकिस्तानी नागरिक होते तर नऊ स्थानिक होते. या व्यतिरिक्त ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.


Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय