Ambani Family Welcomes Bappa: राधिका अनंत अंबानीने केले 'अँटिलिया चा राजा'चे भव्य स्वागत

मुंबई: आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही हा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करतात, आणि यंदाही बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उत्सवात सहभाग घेतला आहे.याचसोबत अंबानी कुटुंबातही ‘एंटीलियाचा राजा’ मोठ्या थाटात आणण्यात आला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची पत्नी राधिका मर्चंट यांनी त्यांच्या मुंबईतील घर एंटीलिया मध्ये गणपती बाप्पाचं भव्य स्वागत केलं, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या व्हिडिओंमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दोघेही पारंपरिक पोशाखात दिसून येतात. दोघंही बाप्पांच्या स्वागतात गुंतलेले असून आजूबाजूला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते. बाप्पांना आणणारा ट्रक फुलांनी सुरेख सजवलेला दिसतो. संपूर्ण एंटीलिया रंगीबेरंगी लाईट्स आणि फुलांनी सजवण्यात आले असून मुंबई पोलिसांचंही बंदोबस्त ठेवण्यात आलं होता.

सोशल मीडियावर ‘एंटीलियाचा राजा’च्या स्वागताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनंत आणि राधिका बाप्पांच्या स्वागतासाठी उभे दिसतात आणि नंतर कारमधून पुढे निघून जातात. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एंटीलियाच्या आतल्या भागाची झलक पाहायला मिळते, ज्यामध्ये अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता बाप्पांच्या स्वागताच्या प्रतिक्षेत दिसते.


 

अंबानी कुटुंबासारखेच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही गणपती बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलं. सोनू सूद, भारती सिंग, हंसिका मोटवानी, अंकिता लोखंडे, पराग त्यागी, युविका चौधरी यांसारख्या अनेक कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना घरी आणलं.
Comments
Add Comment

जिल्हा नियोजन निधी भूगोलावर ठरवू नका, त्या-त्या जिल्ह्याच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घ्या! - आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडले

लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी, तर मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटींचा निधी द्या मुंबई : "जिल्हा नियोजन निधी केवळ

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा