विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील चार मजली जुनी इमारत मध्यरात्री कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत.


स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई इमारतीमध्ये एका कुटुंबात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे अनेक पाहुणे तिथे जमले होते. अचानक इमारत कोसळल्याने सुमारे २०-२५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचा अंदाज आहे.





घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगी आणि एका तरुणाचा समावेश आहे. इतर ९ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बचावकार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत कारण घटनास्थळाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे मदत पोहोचण्यास अडथळे येत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा या भागातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने या घटनेची चौकशी सुरू केली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

NTA : नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय, परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी ६०० तज्ज्ञांना हटवले

नवी दिल्ली : परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना हटवण्याचा

ChatGPT : किशोरांसाठी आलं अधिक सुरक्षित चॅट जीपीटी

मुंबई : १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करता यावा, यासाठी

Jaykumar Gore : पालघर जिल्हा परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

मुंबई : पालघर जिल्हा परिषदेकडील रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Arjuna Award : बुद्धिबळात १९ व्या वर्षी विश्वविजेत्या झालेल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीला फळ; पहिला पंचतारांकित हॉटेल प्रकल्प दृष्टिपथात

 सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासह स्थानिक