विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील चार मजली जुनी इमारत मध्यरात्री कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत.


स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई इमारतीमध्ये एका कुटुंबात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे अनेक पाहुणे तिथे जमले होते. अचानक इमारत कोसळल्याने सुमारे २०-२५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचा अंदाज आहे.





घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगी आणि एका तरुणाचा समावेश आहे. इतर ९ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बचावकार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत कारण घटनास्थळाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे मदत पोहोचण्यास अडथळे येत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा या भागातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने या घटनेची चौकशी सुरू केली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये; कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे निर्देश

१७ लाख कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध; दुसरी यादी १५ दिवसांत, जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

Nashik Crime : १३ लाखांच्या बिलासाठी ४८ हजारांची लाच ! इगतपुरीत ग्रामसेवकासह तिघे ताब्यात

Nashik Crime : विकासकामांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Fishing Ban : राज्यात १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारीला बंदी कायम

मत्स्यव्यवसाय विभागाची माहिती; १२ सागरी मैलांपुढे मासेमारी करण्यास १ ऑगस्टपासून परवानगी मुंबई : सागरी

ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार मोठे बदल? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली मोठी मागणी

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ सुरू होण्यासाठी अजून खूप वेळ असला , तरी स्पर्धेच्या स्वरुपावरून क्रिकेट विश्वात

Maratha Reservation : मराठा समाजासाठी महायुती सरकारएवढे निर्णय कोणीही घेतले नाहीत!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा