Jaykumar Gore : पालघर जिल्हा परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

मुंबई : पालघर जिल्हा परिषदेकडील रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर समाविष्ट करून सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्हे पूर्वी एकाच जिल्ह्याचा भाग होते. जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातील संबंधित कर्मचाऱ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील संबंधित रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही.



यासंदर्भात दि. २४ एप्रिल २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील निकषांनुसार, सलग पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचा पात्रतेनुसार विचार करण्यात येणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीत शासन निर्णयातील निकषांमध्ये बसणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासन निर्णयातील निकषांमध्ये न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचाही स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाकडून हे प्रस्ताव पुढे पाठविण्यात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची पात्रता व शासन निर्णयातील निकष तपासून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.



या बैठकीस दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मनीषा चौधरी यांचीही उपस्थिती होती.पालघर जिल्हा परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकाळाच्या सेवेनुसार न्याय मिळावा, यासाठी पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावासोबतच निकषांमध्ये न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचाही स्वतंत्रपणे विचार व्हावा, या दृष्टीने पुढील कार्यवाहीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीला फळ; पहिला पंचतारांकित हॉटेल प्रकल्प दृष्टिपथात

 सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासह स्थानिक

Sachin Ahir : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; ५० वर्षांच्या मागणीला गती

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी विधान भवनात उपसभापती सचिन अहिर

Eknath Shinde : सरकारी रुग्णालयांमध्ये हलगर्जीपणा चालणार नाही! स्वच्छता, आहार आणि औषधांच्या दर्जावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कडक निर्देश

सरकारी रुग्णालयांची विश्वासार्हता आणखी वाढवा स्वच्छता, रुग्णांचा आहार, औषधांचा दर्जा यावर तडजोड चालणार

Devendra Fadnavis : मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार, मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास मंजुरी

मुंबई : मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच

BHMS Doctors : बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगिती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ED Raid : ₹10 हजार कोटींच्या कथित पॉन्झी घोटाळ्याने खळबळ; ED ची मोठी कारवाई! मुंबई-भोपाळमध्ये छापे, ₹30 कोटींची मालमत्ता गोठवली

Mumbai : मुंबई आणि भोपाळमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे कथित 10 हजार कोटी रुपयांच्या सागा