व्होटचोरीचा आरोप मविआला भोवणार ? मविआ जिंकलेल्या ठिकाणी दुबार मतदार नोंदणी झाल्याचे आरोप


मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला व्होटचोरीचा आरोप मविआला भोवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या मतदारसंघातच दुबार मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्याचे उघड झाले आहे. मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघात किमान १० हजार ते ३० हजार दुबार मतदार नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आला असून, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ३० ते ५० हजार मतदारांची नोंदणी वाढल्याची धक्कादायक माहिती तेथील प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघात २०२४ मध्ये मतदारयाद्या पडताळणीदरम्यान तब्बल ३२ हजार मतदारांची अचानक वाढ नोंदविण्यात आली. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे १२ हजार मतांनी निवडून आले. मतदारसंघात प्रत्येक प्रभागात किमान दोन ते तीन हजार बनावट मतदार आढळले. जवळपास ५० टक्के मतदार हे उत्तर भारतातही मतदार आहेत आणि इथेही स्थलांतरित झालेल्यांनी मतदान केल्याचे असल्याचे आम्ही उघड केले होते. याविषयी विजयी उमेदवारांनी कधी तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही; असे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’चे अतिक अहमद खान म्हणाले. ते अबू आझमी यांच्या विरोधात निवडणुकीत उभे होते.


मालाड पूर्वमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख यांचा ६,२२७ मतांनी विजय झाला तर, भाजपचे विनोद शेलार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ५० हजारांहून अधिक मतदार वाढल्याचा दावा विनोद शेलार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात ३१,२३४ मतदारांच्या समावेशाबाबत हरकत उपस्थित केली होती. याबाबत आव्हाड यांना याविषयी विचारले असता, ‘माझ्या मतदारसंघात तब्बल २७ हजार बोगस नोंदणी झाल्याची तक्रार मी स्वतः केली होती’, असे त्यांनी सांगितले.


Comments
Add Comment

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी

Iran Israel War : अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

धावत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी

Digital Fraud : डिजिटल फसवणूक झाल्यास आता आरबीआयकडून मिळणार नुकसान भरपाई

- आरबीआयचा नवीन मसुदा आराखडा तयार; ६ एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये

आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात