सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना



मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कृषी विभागाचे प्रधानसचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री भरणे म्हणाले की, मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याची सूचना मंत्री राणे यांनी मांडली आहे. या महाविद्यालयाच्या बांधकाम तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी १६१ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा. शासनाच्या सर्व मान्यता घेवून इमारत बांधकाम, मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय आवश्यक मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्‍य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून या विद्यापीठाची इमारत बांधकाम, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.

Comments
Add Comment

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात