अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण बेमुदत सुरू करणार, अशी जाहीर घोषणा करत त्यांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर मुंबईत उतरायचे आवाहन केले. आणखी दोन दिवस तुमच्या हातात आहेत, मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा आणि त्याची अंमलबजावणी करा, त्याच्याशिवाय मी एकही मागणी मागे करणार नाही. मराठ्यांनी काम-धंदे बंद करा, आता मुंबईला जायची तयार करा, असा उठाव पुन्हा होणार नाही, एकजुटीचा असा सोहळा पुन्हा होणे नाही.

म्हणून या लढाईत मराठ्यांनी सहभागी व्हा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून सकाळी 10 वाजता निघणार, 27 तारखेला जुन्नरमध्ये शिवनेरीवर मुक्काम करणार, चाकण, खेड पुढे वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत आंदोलनासाठी पोहोचणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. ४ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईत आंदोलनात घोषणा केली होती. पण चार महिने सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

अंतरवालीत या असं फडणवीसांना सांगितलं होतं. फडणवीसांनी आडमुठेपणा करू नये असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. मुंबईत २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. जरांगेच्या चलो मुंबई आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली