लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?


मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काही दिवसांतच तानाजी सावंत राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण आता परिस्थिती बदलणार असल्याची चर्चा आहे.


काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे मध्यंतरीच्या काळात तानाजी सावंत चर्चेत होते. पण या वक्तव्यांमुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता परत धूसर झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी एकनाथ शिंदे आणि सावंत यांची चर्चा झाली होती. नंतर सावंत आणि शिंदे यांच्यातील अंतर कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईला तातडीच्या भेटीचा निरोप आला आणि त्यांची तात्काळ भेट घेतल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली. या पोस्टमुळे लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत दोन तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली आहे. या पोस्टमुळेच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या निधनानंतर त्यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर रात्री उशिरा शिंदे यांनी कात्रज येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सावंत यांच्यावर ॲंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान शिंदे आणि सावंत यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे तानाजी सावंतांच्या बाबतीत कोय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा