लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?


मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काही दिवसांतच तानाजी सावंत राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण आता परिस्थिती बदलणार असल्याची चर्चा आहे.


काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे मध्यंतरीच्या काळात तानाजी सावंत चर्चेत होते. पण या वक्तव्यांमुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता परत धूसर झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी एकनाथ शिंदे आणि सावंत यांची चर्चा झाली होती. नंतर सावंत आणि शिंदे यांच्यातील अंतर कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईला तातडीच्या भेटीचा निरोप आला आणि त्यांची तात्काळ भेट घेतल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली. या पोस्टमुळे लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत दोन तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली आहे. या पोस्टमुळेच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या निधनानंतर त्यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर रात्री उशिरा शिंदे यांनी कात्रज येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सावंत यांच्यावर ॲंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान शिंदे आणि सावंत यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे तानाजी सावंतांच्या बाबतीत कोय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



Comments
Add Comment

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

पंतप्रधानांबाबतचे काँग्रेस खासदारांचे वर्तन संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारे

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र मुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये

Islamabad Blast: मशिदीत नमाज सुरु असताना स्फोट, १२ ठार; इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित

इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात