गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव


नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री आपोआप पदमुक्त होईल अशी तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारने तयार केले आहे. या विधेयकात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास आपोआप पदमुक्त करण्याची तरतूद आहे. तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रकार घडू नये यासाठी तरतुदी केलेले हे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत ठराव मंजूर करुन संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता विधेयकावर साधकबाधक चर्चा करण्याची संधी असताना विरोधक संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे स्वतःच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनी गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकावर चर्चेसाठी स्थापन होणार असलेल्या संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे.


काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाली. त्यावेळी केजरीवाल गंभीर आरोपात तुरुंगात असूनही त्यांनी राजीनामा देणे टाळले होते. तुरुंगातून मुख्यमंत्री सरकार चालवत होते. कायद्याचे राज्य या संकल्पनेलाच दिल्लीतल्या घटनेमुळे धक्का लागला होता. यामुळेच नैतिकतेचा मुद्दा मांडत केंद्र सरकारने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास आपोआप पदमुक्त करण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर केले. गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री आपोआप पदमुक्त होईल अशी तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारने सादर केले आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर सर्व बाजूंनी पुरेसा विचार व्हावा यासाठीच विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा ठराव केंद्राने लोकसभेत मंजूर करुन घेतला. . आता विधेयकावर साधकबाधक चर्चा करण्याची संधी असताना विरोधक संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे स्वतःच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका