Share Market Holiday: पुढील आठवड्यात केवळ चार दिवस चालणार बाजार! जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असेल?

Share Market Holiday: पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त चार दिवसांसाठी खुला राहणार आहे. तर उर्वरित तीन दिवस हे सुट्टीचे असणार आहेत.

ऑगस्ट महिना संपायला आता एक आठवडाच बाकी राहिला आहे, आणि या शेवटच्या आठवड्यांपैकी केवळ चार दिवसच शेयर बाजार व्यवहारासाठी खुला असणार आहे, तर बाकीचे दिवस बाजार बंद असणार आहे. दिनांक २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, महाराष्ट्र सरकारने या दिवशी सक्तीची सुट्टी जाहीर केल्यामुळे, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील.

गणेश चतुर्थीनिमित्त, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार पुढील आठवड्यात फक्त चार दिवस व्यवहारासाठी खुला राहणार आहे. उर्वरित तीन दिवस सुट्टी असेल. बुधवार, शनिवार आणि रविवारी म्हणजे २७, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही.

शेअर बाजार कधी बंद राहील?


गणेश चतुर्थीनिमित्त बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील कारण महाराष्ट्र सरकारने गणेश चतुर्थीला सक्तीची सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे मुंबईतील बीएसई आणि एनएसई दरवर्षी या दिवशी बंद राहतात. ऑगस्ट महिनाही पुढील आठवड्यात संपत आहे. शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त, सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात इतर काही सुट्ट्या असण्याची शक्यता आहे.

तर ऑक्टोबर महिन्यात, गांधी जयंती आणि दिवाळीनिमित्त २, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी शेअर बाजार बंद राहील. २१ ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग होईल. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत एक तासासाठी उघडे राहते. या काळात ट्रेडिंग शुभ मानले जात असल्याने, मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजारात भरपूर ट्रेडिंग होते. असे मानले जाते की या काळात व्यवसाय केल्याने वर्षभर समृद्धी येते.

पुढील आठवड्यात शेअर बाजार कसा चालेल?


एकीकडे, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असताना, भारतीय शेअर बाजार सकारात्मक दिशेने उघडण्याची अपेक्षा आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढ आणि डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा देखील भारतीय शेअर बाजाराला आधार देईल. मात्र, या सर्वांमध्ये, अमेरिकन टॅरिफ लादण्याची अंतिम मुदत देखील जवळ येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार देखील यावर लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली