Share Market Holiday: पुढील आठवड्यात केवळ चार दिवस चालणार बाजार! जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असेल?

Share Market Holiday: पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त चार दिवसांसाठी खुला राहणार आहे. तर उर्वरित तीन दिवस हे सुट्टीचे असणार आहेत.

ऑगस्ट महिना संपायला आता एक आठवडाच बाकी राहिला आहे, आणि या शेवटच्या आठवड्यांपैकी केवळ चार दिवसच शेयर बाजार व्यवहारासाठी खुला असणार आहे, तर बाकीचे दिवस बाजार बंद असणार आहे. दिनांक २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, महाराष्ट्र सरकारने या दिवशी सक्तीची सुट्टी जाहीर केल्यामुळे, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील.

गणेश चतुर्थीनिमित्त, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार पुढील आठवड्यात फक्त चार दिवस व्यवहारासाठी खुला राहणार आहे. उर्वरित तीन दिवस सुट्टी असेल. बुधवार, शनिवार आणि रविवारी म्हणजे २७, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही.

शेअर बाजार कधी बंद राहील?


गणेश चतुर्थीनिमित्त बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील कारण महाराष्ट्र सरकारने गणेश चतुर्थीला सक्तीची सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे मुंबईतील बीएसई आणि एनएसई दरवर्षी या दिवशी बंद राहतात. ऑगस्ट महिनाही पुढील आठवड्यात संपत आहे. शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त, सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात इतर काही सुट्ट्या असण्याची शक्यता आहे.

तर ऑक्टोबर महिन्यात, गांधी जयंती आणि दिवाळीनिमित्त २, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी शेअर बाजार बंद राहील. २१ ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग होईल. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत एक तासासाठी उघडे राहते. या काळात ट्रेडिंग शुभ मानले जात असल्याने, मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजारात भरपूर ट्रेडिंग होते. असे मानले जाते की या काळात व्यवसाय केल्याने वर्षभर समृद्धी येते.

पुढील आठवड्यात शेअर बाजार कसा चालेल?


एकीकडे, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असताना, भारतीय शेअर बाजार सकारात्मक दिशेने उघडण्याची अपेक्षा आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढ आणि डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा देखील भारतीय शेअर बाजाराला आधार देईल. मात्र, या सर्वांमध्ये, अमेरिकन टॅरिफ लादण्याची अंतिम मुदत देखील जवळ येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार देखील यावर लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

अखेर Vantara आरोपमुक्त! न्यायालयातील विजयासह रिलायन्सकडून प्रतिकिया म्हणाले....' भारताच्या...

मोहित सोमण:आज अखेर रिलायन्स फाउंडेशनच्या 'वनतारा' या देशातील सर्वात मोठ्या प्राणी पुनर्वसन प्रकल्पाला (Rehabilitation Centre)

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया