Mumbai Goa Highway: गणेश भक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न; अनेक किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी आणि रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या खाजगी तसेच सार्वजनिक वाहनांची एकच गर्दी महामार्गावर एकवटली असल्यामुळे,  दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. वाहन काही किलो मीटर पुढे सरकायला देखील तासभर लागत असल्यामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न तर करीत आहे, पण यात त्यांची देखील दमछाक झालेली पाहायला मिळत आहे.


गणेशोत्सव सन हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण मानला जातो. या काळात मुंबईकर आपापल्या गावी प्रस्थान करतात, इतकेच नव्हे तर मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे मुखदर्शन करण्यासाठी राज्यातून  गणेश भक्त मुंबईत येतात. त्यामुळे या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक प्रशासनावर येते. यावर्षी देखील सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खास करून, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे, लवेल, आवाशी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.


यावर्षी गणेश चतुरती बुधवारी, दिनांक २७ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे मुंबईतील कोकणवासीयांनी आपापल्या गावी रवाना होण्यासाठी शनिवार आणि रविवारचा दिवस निवडला. याचमुळे काल आणि आज महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गासोबतच इतर पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे भरपूर हाल होत आहे. हीच परिस्थिती आणखीन दोन दिवस मुंबई गोवा महामार्ग तसेच कोकणात जाणाऱ्या इतर पर्यायी मार्गावर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून