आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा


मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. बीडच्या मांजारसुंबा येथे झालेल्या बैठकीअंती जरांगेंनी राज्य शासनाला इशारा दिला. याप्रसंगी कार्यकर्त्यांशी बोलताना जरांगेंनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा; असे जरांगेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.


एकही मराठ्याची अस्सल अवलाद माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही गर्व वाटावं असं काम करत आहेत. बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. चलो मुंबई. २९ ऑगस्टला जमून फाईटच आहे. काय मराठ्यांची अवलाद आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आपल्याला शांततेत जायचं आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे; असं मनोज जरांगे म्हणाले.


आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकराबाळांसाठी यावं लागतंय. २९ ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. २७ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आंतरवलीतून मुंबईला निघायचं. समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही. कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही", असंही मनोज जरांगे म्हणाले.


'आता फक्त बीडमध्ये डीजे वाजूदे मग सांगतो'


बीडच्या मांजारसुंबा येथे जरांगेंच्या सभेसाठी आयोजकांनी डीजे वाजवण्यासाठी परवानगी मागितली होती. पण त्यांची मागणी डीवायएसपींनी मान्य केली नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात डीआवयएसींना इशारा दिला. 'मला आणि माझ्या समाजाला डीजे वाजू दिला नाही म्हणून काय अडचण नाही. पण डीवायएसपी साहेबांना एकच सांगतो, सत्ता येत असते आणि जात असते. सत्ता बदलत असते. मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, माझ्या डोक्यात जो एकदा बसला त्याचा बाजार उठवतो. धमकी देत नाही. समजून सांगतो. बीड जिल्ह्यात दुसऱ्या कुणाचा डीजे वाजू देत. मग सांगतो तुम्हाला. डीजेमध्ये काय दहशतवाद्यांच्या बंदूक आहेत का ?' असे मनोज जरांगे म्हणाले.


Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या