E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेसबरोबरच सीएनजी बसेसचा वापरही वाढवण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. तर याआधीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत. सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किमी अंतर पार करू शकतात आणि त्यांची क्षमता २८० किमीपर्यंत आहे.

ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेत तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही अशी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.
Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,