E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेसबरोबरच सीएनजी बसेसचा वापरही वाढवण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. तर याआधीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत. सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किमी अंतर पार करू शकतात आणि त्यांची क्षमता २८० किमीपर्यंत आहे.

ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेत तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही अशी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.
Comments
Add Comment

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक

भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे