E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेसबरोबरच सीएनजी बसेसचा वापरही वाढवण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. तर याआधीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत. सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किमी अंतर पार करू शकतात आणि त्यांची क्षमता २८० किमीपर्यंत आहे.

ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेत तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही अशी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.
Comments
Add Comment

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

वावी हर्ष येथील घटना; आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास नाशिक : दोन तासापासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्याने गरोदर

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश