E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेसबरोबरच सीएनजी बसेसचा वापरही वाढवण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. तर याआधीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत. सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किमी अंतर पार करू शकतात आणि त्यांची क्षमता २८० किमीपर्यंत आहे.

ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेत तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही अशी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.
Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे