ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. यातच सणासुदीचे दिवस आले की डाळ, हरभरा, साखर, मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते; परंतु मैदा, हरभरा डाळ व तूर डाळ यांच भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, खाद्यतेल, डाळ, साखर, मैदा आणि रव्याच्या दरातही तब्बल १०० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरखर्चाचा तोल बिघडात असून, ऐन सम्णासुदीच्या काळात महागाईचा फन्टका बसणार आहे.


सणांच्या दिवसांत मैदा, रवा आणि गोडधोडासाठी लागणाऱ्या तर साहित्याची मागणी वाढते. या मागणीचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे, विशेषतः गोडधोड आणि पंचपक्वान्नांची रेलचेल असलेल्या सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. कृतीचा भाग सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो.


सामान्य कुटुंबांची डाळ शिजेनाशी झाली आहे. सणावारांच्या तोंडावर वाहलेल्या मागणीमुळे हरभरा, तूर आणि मसूर डाळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, रेशनमधून मिळणाऱ्या डाळ, साखर, रचा, तेल या 'आनंदाच्या शिधा'ने सामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र, आता तो शिधा बंद झाल्याने नागरिकांना मोकळ्या कळ्या बाजारपेठेतूनच वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे महागाईची झळ यंदा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.



हरभरा, बेसनसह अनेक गोष्टी महागणार


गौरी-गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत हरभरा व बेसन डाळीला मोठी मागणी राहणार असून त्याचा परिणाम भावावर होणार आहे. महागाईची झळ थेट सर्वसामान्याच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.


Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा